समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं
कवितेच्या तळमळीनं सर्जनाच्या ऊर्जेनं व्यापक होत जाताना कवीची घालमेल होते, कस लागतो व शेवटी ऐरणीवर त्याची सांगता होते. तिचा आस्वाद घेताना, ती किती खोलवर भिडतेय, भंडावून सोडतेय, निखळ आनंद देतेय, अस्वस्थ करतेय की अंतर्मुख करते याचाच विचार व्हावा आणि म्हणूनच ती चांगली किंवा वाईट या दोनच निकषांवर दाद देऊन तिचा आस्वाद घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय.......